1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

रेल्वे भरतीवरून आव्हाडांचा संताप

केंद्र सरकारकडे ६२५ रूपये पडून

रेल्वे भर्ती परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारपासून आंदोलन सुरू केलं आहे. बिहारच्या गया शहरात आंदोलकांनी रेल्वेचे डबे पेटवून दिल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत केंद्र सरकावर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या भरती प्रक्रियेबाबत वास्तव सांगितलं आहे. आव्हाडांनी याबाबत टि्वट करीत केंद्र सरकारवर टीका केली आहे.

“बिहारमध्ये सुरू असणाऱ्या रेल्वे बोर्ड-NTPC साठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लढाईतील एक वास्तव सांगतो. जागा होत्या सगळ्या मिळून ३७ हजारांच्या आसपास. अर्ज आले जवळपास १,२५,००,००० (सव्वा करोड). आणि एका अर्जाची किंमत होती ५०० रुपये. एकूण झाले ६२५ करोड रुपये. एवढा पैसा, १ वर्ष झाले केंद्राकडे पडून आहे. त्यावरच वर्षभरातील गोळा झालेलं व्याज वेगळं.यावर एकतरी मीडिया हाऊस ने चर्चा घडवून आणली का..?” असे टि्वट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

”NTPC च्या परीक्षेसाठी एवढे अर्ज म्हणजे देशातील वास्तव आहे. हे भयाण वास्तव देशातील रोजगाराचे, बेरोजगारीचे आहे. हा स्फोट देशात अराजक माजवू शकतो.वेळीच सावध होऊन तरुणांच्या हातांना काम द्या. त्यांच्या स्वप्नांच्या सोबत खेळू नका,” असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Avatar

RAHUL PATIL

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड; चि...

October 21st, 2021 | RAHUL PATIL

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबाबतचा ...

शेतकऱ्यांनी दिली ‘भारत बंद’ची हाक

September 27th, 2021 | RENUKA KINHEKAR

शेतकरी बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ४० शेतकरी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सं...

भारताने निर्माण केले 863,000 Green Jobs

September 26th, 2022 | RENUKA KINHEKAR

नागपूर : नूतनीकरणक्षम ऊर्जा बाजारपेठेत (renewable energy market) भाग घेणाऱ्या देशांची संख्या वाढत आहे. 2020-21 मध्ये, भारत...