1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

१५ ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार

Devendra Fadnavis-thefreemedia
Spread the love

देवेंंद्र फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता कधी होणार? असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार विचारला जात आहे. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीमुळं मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा आरोपही केला जात आहे. या सर्व टीकांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असे कोठेही म्हटलेले नाही. सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नाही. मंत्रिमंडळ विस्तार १५ऑगस्टच्या आधी होईल आणि लोक विचार करत आहेत त्यापेक्षाही हा विस्तार लवकरच होईल असे स्पष्ट करत विरोधकांचं तोंड गप्प केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मंत्रिमंडळ विस्तारावरून वारंवार टीका करत असल्याचे दिसून येत आहेत. पवार यांनी एक महिना झाला मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. प्रत्येकवेळी एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना मिडिया विचारतो कधी ? त्यावर लवकरच , लवकरच एवढेच शब्द येतात. होईल पण मंत्रिमंडळ विस्तार होणार कधी अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेलाही फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार १५ ऑगस्टच्या आधी होईल अशा शब्दात उत्तर दिलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनीही शनिवारी दिल्लीमध्ये बोलताना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणतीही अडचण नसल्याचं म्हटलं आहे.

राजकारणासाठी डायलॉगबाजी

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्यात आल्यानंतर सचिवालयाचे मंत्रालय होते आता मंत्रालयाचे सचिवालय झाले अशी टीका होत आहे. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले महिती असतानाही राजकारणासाठी डायलॉगबाजी केली जाते. हे अधिकार फक्त क्वासी ज्युडिशरी प्रकरणांच्या सुनावणीसाठी दिलेले आहेत. आधीच्या सरकारमध्येही अनेक सचिवांना अधिकार होते. आमच्या सरकारच्या काळातही त्यावेळी मंत्र्यांनी अनेक सचिवांना अधिकार दिले होते. महाराष्ट्रात नाही देशात ही परंपरा आहे. त्यामुळे बाकी कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाही. सरकार जनतेचे आहे. जनतेचे मुख्यमंत्री आहेत मी त्यांच्यासोबत कॅबिनेटमध्ये आहे. जनतेचे लोकच महाराष्ट्रात निर्णंय घेतील असंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं

मी रिकामटेकडा नाही

शिंदे गटातील काही आमदारांनी मैत्रीदिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे असे इच्छा व्यक्ती केली आहे. या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, कोणी काय बोलावे याला राजकारणात महत्व नसतं. परिस्थिती काय याला महत्व असतं. कोण काय बोलले यावर प्रतिक्रिया देण्याइतका मी रिकामटेकडा नाही असे स्पष्ट उत्तर देत या उलट सुलट चर्चेला विराम दिला.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    चिपी विमानतळ उड्डाणास सज्ज; ९ ऑक्टोबर रोजी उद्घाटन

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ विमान उड्डाणासाठी सज्ज झाले असून येत्या ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्ध...

    गाव जेवण एक दिवस देणार की पुढील तीन वर्षे? अशोक चव्ह...

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveदेगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत प...

    पाडवा विशेष…’मटणा’चे भाव गगनाला...

    September 7th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveश्रावण मास संपण्याची वाट बघणारे नागपूरकर व राज्यातील सर्वच नागरिकांच्या खिशास चाप बसणार असल्याची माहिती आज ...