केंद्र सरकारने इंधानावरचे उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे पेट्रोल डिझेल स्वस्त झाले असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील इंधन दर कमी करण्याचा निर्णय अखेर रविवार, २२ मे रोजी घेतला. त्यानुसार पेट्रोल २ रुपये ६ पैशांनी स्वस्त मिळेल तर डिझेल १ रूपया ४४ पैशाने स्वस्त होणार आहे. मात्र, राज्य सरकारने इतका कमी रुपयांनी इंधनावरचा दर कमी केल्यामुळे विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “इंधन दर कपात करताना केंद्र सरकारने २,२०,००० कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला आहे. असं असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा १५ टक्के आहे. इंधन दर कपातीत राज्य सरकारने किमान १० टक्के तरी भार घ्यायचा होता. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’!” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सणसणीत टीका केली आहे.
तसेच “अन्य राज्य सरकारे ७ ते १० रुपये दिलासा देत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याने १.५ आणि २ रुपये दर कमी करणे, ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना मनाचा थोडा मोठेपणा दाखविला असता तर बरे झाले असते!” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
- online casino india
- best online casino in india
- best online casino india
- online casino india real money
- online casino in india
- online casino games in india
- online casino games india
- online casino real money india
- best casino in india online
- online casino games for real money
- casino in india online
- casino games india
- best casino in india
- online casino game real money
- casino india online
- crazy time casino india
- casino online india
- online casino play for real money
- casino games in india
- best online live casino india