1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

तरंगत्या दगडात बांधले गेलेय हे ८०० वर्षे जुने मंदिर

temple built in floating stone
Spread the love

भारताची ओळख मंदिराचा देश अशीही आहे. देशात अशीही अनेक मंदिरे आहेत जी रहस्यमयी म्हणून ओळखली जातात. ही यादीही भली मोठी आहे. त्यातील एक प्रसिद्ध मंदिर तेलंगणाच्या वारंगळ येथे असून हे मंदिर शिवाला समर्पित आहे. हे मंदिर तरंगणाऱ्या दगडातून बनविले गेले आहे. हे शिवमंदिर रामाप्पा मंदिर नावाने प्रसिद्ध असून मंदिराला हे नाव मंदिर बांधणारे शिल्पकार रामाप्पा याच्यावरून दिले गेले आहे.

१२ व्या शतकात काकतीय वंशाचा राजा गणपती देवा याने १२१३ मध्ये या मंदिराचे बांधकाम सुरु केले आणि ते पूर्ण होण्यास ४० वर्षे लागली. या काळातील अनेक मंदिरे आज भग्नावस्थेत आहेत मात्र रामाप्पा मंदिर अनेक नैसर्गिक आघात सोसूनसुद्धा आजही चांगल्या स्थितीत आहे. हे मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत कसे याचे संशोधन वैज्ञानिकांनी केले पण काही उलगडा झाला नाही तेव्हा त्यांनी मंदिरात वापरल्या गेलेल्या दगडाचे परीक्षण केले. हे दगड अतिशय हलके आहेत आणि त्यांचे तुकडे पाण्यात तरंगतात असे यातून दिसून आले.

हे मंदिर सहा फुट उंचीच्या जोत्यावर बांधले गेले असून मंदिराच्या भिंतीवर रामायण महाभारतातील प्रसंग कोरले गेले आहेत. हे सर्व काम अतिशय सुबक आणि सुंदर आहे. मंदिरात ९ फुट उंचीचा नंदी आहे. राजा गणपती देवा शिल्पकार रामाप्पा याच्या कामावर इतका खुश झाला होता की त्यानेच या मंदिराचे नाव रामाप्पा मंदिर असे ठेवल्याचे सांगितले जाते.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भारतात गुंतवणूक करण्याची ही सर्वोत्तम वेळ:पंतप्रधान ...

    January 18th, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveआपल्या भाषणात पीएम मोदी म्हणाले, “भारतासारख्या मजबूत लोकशाहीने संपूर्ण जगाला एक सुंदर भेट दिली आहे, ए...

    जोपर्यंत युद्ध सुरू आहे, तोवर शस्त्रे खाली ठेवू नका’...

    October 22nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारताने काल १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला. तसेच दिवाळीचा सण जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नर...

    आजपासून उदगीरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

    April 22nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveआज दि. २२ एप्रिलपासून लातूर येथील उदगीरमध्ये ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात होणार आहे....